१.बच्चू कडू यांचा जन्म बेलोरा,ता.चांदूर बाजार जिल्हा-अमरावती येथे ५ जुलै १९७० रोजी शेतकरी कुटूंबात झाला.
२.इयत्ता नववीत असताना गावात याञेत होणारा तमाशा बंद पाडून त्यांनी गावातील तरूम पिढी बरबाद होण्यापासून वाचवली.
३.मिञाला रक्तदान करताना वजन कमी पडत असल्यामुळे खिशात दगड ठेऊन त्यांनी रक्तदान करून मिञाचा जिव वाचवला.
४.रक्तदानाचे शतक पूर्ण करणारा एकमेव आमदार बच्चू कडू आहे.
५.त्याच्या प्रहार संघटने मार्फत आजपर्यत लाखाच्या वर रक्त पिशव्या दान करण्यात आल्या आहे.
६.बाळासाहेबांच्या भाषणांचा त्यांच्यावर प्रभाव होता,ते शिवसेनेकडून चांदूर बाजार समितीचे सभापती होते.
७.सभापती असताना त्यांनी संडास घोटाळा उघडकीस आणला, अपंगाना सायकल वाटपाचा निधी न दिल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यासोबत वाद झाल्याने त्यांनी शिवसेना सोडली.
८.त्यांनी 1999 साली पहीली आमदारकीची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली, त्यात त्यांचा अवघ्या 1300 मतांनी पराभव झाला.
९.बच्चू कडूच्या पहिल्या निवडनुकीत प्रचारा करिता पैसा नसल्याने त्याच्या बर्याच मित्रांनी घरातील दागिने मोडली , पत्नीचे मंगळसूत्र सुध्दा गहाण ठेवले. आजही बच्चू कडू त्या मित्राचा अभिमानाने उल्लेख करतात.
१०.लोकांना न्याय हक्क मिळून देण्या करिता स्वतःला जमिनीत गाडून घेणारा हा पहिलाच आमदार असेल.
११.बच्चू कडू यांनी लग्न महत्मा गांधी जयंतीला राष्ट्रगीताच्या चालीवर केले व लग्नाचा खर्च टाळून अपंगांना साहित्य वाटप करण्यात आले.
१२.शासकीय अधिकारी काम करत नसल्याचे पाहून त्यांनी या अधिकार्यांच्या कॅबिनमध्ये साप सोडणे,कार्यालयात सुतळी बाॅम्ब फोडणे अशी आंदोलने केली, त्यांचे विरूगिरी हे आंदोलन खुप गाजले.
१३.2004 साली त्यांनी परत अपक्ष म्हणून आमदारकी लढवली आणि ते निवडून आले, आज सलग तीन वेळा ते अपक्ष आमदार आहेत.
१४.बच्चू कडू यांनी आत्तापर्यंत 18 लाख रूग्णांना मोफत रूग्णसेवा दिली आहे.
१५.तीन वेळा आमदार असणाऱ्या बच्चू कडू यांचे आजही स्वःताचे घर नाही,भाड्याच्या घरात ते राहतात. त्यांची पत्नी शिक्षिका आहे.
१६.बच्चू कडू हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहेत ज्यांनी आमदारांच्या पगारवाढीला विरोध केला.
१७.बच्चू कडू हे सर्पमिञ आहेत, त्यांना खेळाची आवड आहे, घोडेस्वारी त्यांना आवडते.
१८.सामान्य माणसांप्रमाणे लोकात राहण्याची त्यांची शैली प्रभावशाली आहे.
१९.लोकमतने त्यांना यंदाचा ‘महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर’ या पुरस्काराने सन्मानित केले. हा पुरस्कार मिळविणारे बच्च्चू कडू पहिले अपक्ष आमदार आहे.
२०.अपंगांकरिता २५,००० लोकांचा दिल्ली येथे मोर्चा नेणारे बच्चू कडू पहिले अपक्ष आमदार व त्याची फलश्रुती एका दिवसात ११ शासन निर्णय केंद्राने पारित केले.
२१.बच्चू कडूचे आंदोलन विशेष असतात व निर्णय लागो पर्यंत ते आंदोलन सुरु ठेवतात. त्याचे उपोषण २१ दिवसापर्यत चाललेले आहे.
आपला भिडु बच्चु कडु, जय प्रहार.
Aamdarsaheb start your own party develop in whole maharastara .Iwill join in your party …….Swami shankaryya ,sarpanch gp, Gholasagaon. Ta: Akkalakot
lok pratinidhi mhanun apan samanatyalach ek ahot ani tyani apli niwad tyanchya prashnana vacha fodnyasathi keli ahe ……he uttam jannare bhau ,aplya shailitun anya lok pratinidhina lajwel ashi khari odakh nirman keli ………….ek amdar mhanun te kharya arthane maharashtrachya bhumiche khare ratn ahe ……………..
मला वाटत , ज्या मातेने यांना जन्म दिला ती जिजामाते चे दुसरे रूप असणार. अश्या समाजकार्यासाठी स्वतचे रक्त देणाऱ्या महान मानवाला माझा मुजरा.
मलाही या मानवा सोबत समाज कार्य करायला आवडेल . माझी खूप मनापसून अशी इच्या आहे . कारण समाजासाठी राजकारणात येणारे कोणीच नसतात, येतात ते फक्त समाज्याचा वापर करून पैसा कमावण्यासाठी.. पैसा कमावणे हाच त्यांचा कर्म आणि धर्म होतो..
नमस्कार .
मी ह्या भारत देशाचा ,
आणि हा भारत देश माझा…..
असा ज्याचा भाव तोच खरा देशभक्त
आणि माझा बच्चु भाऊच खरा देशभक्त आहे
???
Kup Chan baccu bhau asech Kam Karat Raha Ani apanchi madat Kara brhatcara virudh andolan Kara
अपना भिडु बंचु कडु
aisa aamdar hone nahi
Nice, i like prahar sanghatna & it’s working for poor farmar and villagers