Tuesday, July 5, 2022
  • Login
Khaas Re
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
Khaas Re
No Result
View All Result

भगत सिंहची फाशी गांधीजी रोखू शकत होते काय ? राज कुलकर्णीचा अभ्यासपूर्ण लेख

khaasre by khaasre
March 23, 2019
in बातम्या
0
भगत सिंहची फाशी गांधीजी रोखू शकत होते काय ? राज कुलकर्णीचा अभ्यासपूर्ण लेख

“भगतसिंगांसाठी गांधीजींनी काहीच केलं नाही. मनात आणलं असतं तर ते भगतसिंगांची फाशी वाचवु शकले असते, परंतु जाणुनबुजुन त्यांनी तसं केलं नाही. ” अशी एक चर्चा सध्या मुद्दामहून होत आहे . पण त्याबाबत ची वस्तुस्थिती वेगळीच आहे . गांधी वर टीका करण्यासाठी भगत सिंग च्या खांद्यावर बंदूक ठेवणारे लोक कोणत्या विचाराचे आहेत ,हे सांगायची गरज नाही . भगत सिंग,सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी ची शिक्षा ,७ ऑक्टोबर १९३० ला सुनावण्यात आली या शिक्षेच्या विरुद्ध केलेले special petition हे त्यावेळी privy council समोर करावे लागत होते . ते petition ११ फेब्रुवारी रोजी फेटाळले. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू १९२९ च्या कॉंग्रेस चे अध्यक्ष होते .

संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारा गांधी -आयर्विन कराराचा मसुदा त्यांचाच होता, या कराराच्या वेळी ही भगत सिंह ला माफी मिळावी म्हणून एक प्रमुख मुद्दा होता , नेहरूंच्या पुढाकाराने मदन मोहन मालवीय यांनी १४ फेब्रुवारी १९३१ ला दया याचिका दाखल केली ती २० मार्चला फेटाळली गेली . गांधी आणि लॉर्ड आयर्विन यांची चर्चा १७ फेब्रुवारी पासून सुरू होऊन ५ मार्च १९३१ ला पुर्ण झाली आणि तो ऐतिहासिक करार झाला आणि त्यावेळी देखील भगत सिंह च्या माफीवर चर्चा झाली. या वेळी करारादरम्यान गांधीजींनी ९० हजार भारतीय कैद्यांना मुक्त करण्यास सहमती मिळवली. हा प्रसंग अजय देवगण याच्या ‘ दि लेजंड ऑफ भगत सिंग ‘ या चित्रपटात खूप चपखलपणे दर्शविला आहे ,जो वास्तवाशी जवळीक असणारा टिपला आहे . त्यावेळी करार महत्वाचा होता म्हणून करार झाल्यानंतर पुन्हा २१ मार्च ला गांधीजीनी लॉर्ड आयर्विन ची भेट घेवून भगत सिंह ला माफी देण्याची विनंती केली , याच अनुषंगाने २२ मार्च ला देखील गांधी यांनी लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली आणि या भेटीत प्रथमच लॉर्ड आयर्विन यांनी भगत सिंग च्या माफी बाबत नक्की प्रयत्न करेन असे आश्वासन दिले.

गांधीजींनी २३ मार्च रोजी गांधी यांनी लॉर्ड आयर्विन यांना पुन्हा पत्र लिहिले आणि त्या पत्रात येशूची दयाबुद्दी आणि त्याचबरोबर त्यांच्या ख्रिस्ती धर्मातील दया भावनांना साद घातली ,हे पत्र ज्या दिवशी पाठवले त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता तिघांना फाशी दिले. गांधीजींनी अथक प्रयत्न करून देखील कांही उपयोग झाला नाही . भगत आणि त्याच्या सहकार्यांना फाशी दिली गेल्याची बातमी समजताच प्रचंड जनक्षोभ उसळला, १९३१ मध्ये कराची मध्ये होणाऱ्या कॉंग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष सरदार पटेल होते ,त्यांना आणि गांधीजींना लोकांनी काळे झेंडे दाखवले .गांधींनी काय प्रयत्न केले याची माहिती नेहरूंच्या आत्मचरित्रातून किंवा संन्याल वगैरेंच्या लिखाणातून मिळते अगदी याचा दाखला लॉर्ड आयर्विन यांच्याही लिखाणात आहे.

“As I listened to Mr. Gandhi putting the case for commutation before me, I reflected first on what significance it surely was that the apostle of non-violence should so earnestly be pleading the cause of the devotees of a creed so fundamentally opposed to his own, but I should regard it as wholly wrong to allow my judgment to be influenced by purely political considerations. I could not imagine a case in which under the law, penalty had been more directly deserved.”

इंग्रजांनी एवढी कठोर भूमिका घेण्याची हि काही कारणे होती . भगत विरोधात प्रचंड नाराजी civil services officers मध्ये होती . पंजाब प्रांताच्या गवर्नर ने भगत सिंग ला माफी दिल्यास राजीनामा देण्याची धमकी दिली होती ,कारण भगत ला फाशी Saunders च्या हत्येच्या खटल्यात झाली होती ,त्यामुळे युरोपियन ICS केडर फाशीचे समर्थक होते. ICS केडर च्या नाराजीचा परिणाम असा होता की ,संपूर्ण वसाहती देशातील ICS केडर च्या अधिकाऱ्यांची एकी निर्माण झाली होती , ब्रिटीश त्यांच्या राज कारभाराच्या दृष्टीने भारतातील भगत सिंह साठी आफ्रिका ,म्यानमार ,अफगाणिस्तान ,अरब देश आदी वसाहतीतील अधिकाऱ्यांना नाराज करू इच्छित नव्हते. याचा दुसरा परिणाम देखील असा होता की ,ब्रिटीश युवक वसाहतीतील नौकरीसाठी पुन्हा तयार होणार नाहीत , ICS केडर च्या एकजुटीचा उइद्देश हा देखील होता !

या सर्व कारणास्तव भगत सिंह ला माफी मिळणे कठीण गोष्ट होती आणि एकदा दया याचिका फेटाळली कि निर्णय पूर्णतः पंजाब गवर्नर च्या हातात होता. या बाबत विस्तृत माहिती असफ अली, अरुणा असफ अली, आणि जे. एन . सन्याल यांनी लिहिली आहे . वी.एन . दत्त यांनी गांधीनी भगत सिंग आणि त्याच्या साथीदारांना वाचविण्याचे प्रामाणिक प्रयत्न केल्याचे नमूद केले आहे. भगत सिंह यांना वाचविण्याचा गांधीजींनी प्रयत्न केल्याचा उल्लेख नेहरूंनी त्यांच्या आत्मचरित्रात सुद्धा केला आहे, खुद्द पटेल आणि नेहरूंनी सुद्धा त्यांच्या परीने प्रयत्न केले .

पण महत्वाची गोष्ट अशी कि , भगत सिंग ,सुखदेव आणि राजगुरू यांना वाचवण्याचा जो काही प्रयत्न केला तो गांधी -नेहरू -पटेल यांनीच केला , आज भगत सिंह यांची बाजू घेवून गांधी वर आरोप करणाऱ्या कोणत्याही संघटनेने तसा प्रयत्न केला नाही. स्वातंत्र्य वीर सावरकर त्यावेळी रत्नागिरी इथे वास्तव्यास होते ,त्यांनी एखादे पत्रक काढून किंवा लेख लिहून भगत सिंह, सुखदेव ,राजगुरू यांना माफी द्यावी असे आव्हान केले नाही. त्यावेळी केशव बळीराम हेडगेवार हे सरसंघचालक होते, मात्र त्यांनी पत्रक काढून महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाच्या आंदोलनापासून अलिप्त राहावे असे आव्हान केले, ही बाब संघ विचारांचे लेखक चं. प. भिशीकर यांनी नमूद केली आहे . मात्र सत्याग्रहाच्या आंदोलनापासून अलिप्त राहावे म्हणून पत्रक काढणाऱ्या संघाने भगत सिंह चे समर्थन करणारे किंवा भगत सिंह ला माफी द्यावी असे कोणतेही पत्रक काढले नाहीत ,किंवा तसे प्रताय्त्न देखील केले नाहीत .

भगत सिंह चे कार्य महान आहेच ,पण भगत सिंह ला माफी मिळाली असती तर काही अटी नक्कीच लादल्या गेल्या असता, कारण सरकार माफी देताना अशा अटीवरच माफी देत असे उदाहरणार्थ सांगायचे तर, विनायक दामोदर सावरकर यांच्यावर अंदमान हून सुटका करून घेताना सरकार विरोधात कोणतेही कार्य करणार नाही , स्वातंत्र्य चालवलीत भाग घेणार नाही ,नेहमी मायबाप इंग्रज सरकारच्या आदेशाचा सन्मान केला जाईल ,अशा अटी लादल्या होत्या ! सावरकर यांनी प्रामाणिकपणे ब्रिटीशांच्या अटीचे तंतोतंत पालन केल्यामुळे सावरकर यांच्यावर ब्रिटिशांनी कोणतीही कारवाई केली नाही ,पण भगत सिंह यांचे एकंदर क्रांतिकारी विचार पाहता आणि स्वाभिमानी स्वभाव पाहता भगत सिंह याने या अटीचे पालन केले असते ,असे आपण ठामपणे म्हणून शकत नाही आणि अटी न पाळणाऱ्या भगत सिंह ला सतत माफी मिळणे देखील अशक्य होते . भगत सिंह ला माफी मिळाली असती ,तर त्याचे नाव कदाचित एवढे अजरामर झालेच नसते.

भगत सिंह हिंदुत्ववादी नव्हता तर तो मार्क्सवादी होता ,नास्तिक होता आणि जन्माने तथाकथित उच्चवर्णीय देखील नव्हता ! त्यामुळे माफी मिळाल्यानंतर माफिनाम्यातील अटीनुसार ब्रिटीश मायबाप सरकारचे आदेश तंतोतंत पालन त्यास करावे लागले असते आणि असे पालन त्यानेही केले असते तर माफी मागणाऱ्या इतरांना ज्याप्रमाणे गौरविण्यात आले ,तो गौरव ,तो सन्मान त्याच्या मिळाला असता किंवा दिला गेला असता ,याची शक्यता खूप धुसर असल्याचे चित्र दिसते ! भारतीय समाज रचनेचे ते एक वास्तव आहे !

राज कुलकर्णी .( संदर्भ: –

1) Gandhi Marg Vol no.32 Issue no .3 Oct-Dec.2010 – Chander Pal Singh 2) Bhagat Singh Diaries – J.N.Sanyal 3) Selected writings of Bhagat Singh – Shiv Varma, Samajvadi Sadan Kanpur. 4) Fragments of Past – Aruna Asaf Ali. 5) Homage to Martyrs- Pub.Shahid Ardh shatabdi Samaroh Samiti, Dehli 1981. 6) Towards Freedom- Jawaharlal Nehru. 7) Savarkars Mercy Petition – Frontline Volume 22 – Issue 07, Mar. 12 – 25, 2005

Loading...
Previous Post

सनी लिओनीला महेंद्रसिंग धोनी का आवडतो माहिती आहे का?

Next Post

जावेद अख्तर यांनी पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाच्या ट्रेलरमधील ही मोठी चूक पकडली !

Next Post
जावेद अख्तर यांनी पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाच्या ट्रेलरमधील ही मोठी चूक पकडली !

जावेद अख्तर यांनी पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाच्या ट्रेलरमधील ही मोठी चूक पकडली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील वाचा

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

May 24, 2022

What is Health Insurance & Its Advantages?

April 28, 2022

Top Online MBA Colleges in the USA

April 28, 2022

4 Most Popular Digital Marketing Agency USA and List

April 27, 2022

The Top 10 Affiliate Marketing Companies for Beginners.

April 27, 2022

The Best affiliate company to work for in the USA

April 27, 2022
Load More

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • About Us
  • About Us
  • Advertise
  • All Articles
  • Archive
  • Blog
  • Contact Us
  • Contacts
  • Easy Sharing
  • Home
  • Infinite Scroll
  • Our Team
  • Overlay Header
  • Portfolio
  • Privacy Policy
  • Services
  • Sorted by Topics

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In