Friday, August 12, 2022
  • Login
Khaas Re
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
Khaas Re
No Result
View All Result

मराठ्यांच्या आरमाराची ताकद माहितीये? केतन पुरी यांचा अभ्यासपूर्ण लेख

khaasre by khaasre
October 24, 2018
in बातम्या
0
मराठ्यांच्या आरमाराची ताकद माहितीये? केतन पुरी यांचा अभ्यासपूर्ण लेख

“आरमारात माणसे नाहीत.विश्वासू अधिकारी नाहीत.आमचे किल्ले निरुपयोगी.तंत्रांची,दारुगोळ्याची कमतरता,द्रव्याची टंचाई तर पाचवीलाच पूजलेली.साऱ्या राज्याची अवस्था शोचनीय झाली आहे.मोगलांचे थोडेफार सहाय्य असले,तरी संभाच्या आक्रमणाची शक्यता आहेच.आमचे हे राज्य,हातातून जाण्याची भीती वाटत आहे.” गोव्याच्या व्हाइसरॉय ने आपल्या राजाला 25 जानेवारी 1684 रोजी लिहीलेले पत्र.. आणि यामधुन जाणवनारी संभाजी महाराजांच्या पराक्रमाची ताकद..!!

तसे पाहायला गेले,तर मराठ्यांशी पोर्तुगीजांनी आधीच्या काळात म्हणजेच शहाजी महाराजसाहेबांच्या काळात,चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा आटापिटा केल्याचा दिसून येतो. तेव्हाचा व्हाइसरॉय Conde de Alvora च्या हस्ते पोर्तुगीज राजाने शहाजी महाराजांसोबत मैत्री व्हावी,अशा इच्छेचे पत्र पाठवले होते.पोर्तुगीजांना आधीच्या काळात जर कुणाची जरब वाटत असेल,तर ती महाबली शहाजी महाराजांची..

म्हणूनच की काय,शिवरायांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाही पोर्तुगीजांनी महाराजांविरोधात कुठलीही कारवाई करण्याचे धाडस केले नाही.इतकेच काय,तर इसवी सन 1667 च्या अखेरीस पोर्तुगीज व्हाइसरॉय Conde de San Vincente आपल्या राजाला लिहीतो, “आम्ही शिवाजीच्या सागरी अरमाराला घाबरतो.आम्ही कसल्याही प्रकारचा विरोध करण्यास असमर्थ असून,शिवाजीने कोकण किनारपट्टीवर अनेक किल्ले बांधले आहेत.आणि त्याच्या ताब्यात असणारी जहाजे ही फार मोठी आहेत.”

मराठ्यांची जहाजे लहान होती,असा सर्वत्र उल्लेख मिळत असताना,पोर्तुगीजांनीच लिहुन ठेवले आहे की शिवाजीची 3 भली मोठी धान्याने भरलेली जहाजे बाहेर देशातून येताना समुद्रात बुडाली. Roe Leitao Viegas आणि त्याचा भाऊ Fefnao Leitao Viegas ह्या दोन पोर्तुगीज भावांनी कल्याण,भिवंडी आणि पनवेल येथे मराठ्यांसाठी जहाज बांधनी काम चालू केले.पण त्याच वेळेस,मिर्झा राजा जयसिंह याने औरंगजेबाकडे पोर्तुगीजांची तक्रार केली आणि त्यामुळे 19 मे 1667 ला पोर्तुगीजांनी या दोन भावांना वापस बोलावून घेतले.

शिवरायांच्या आरमाराची दहशत एवढी होती,की 30 नोवेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात व्हाइसरॉय म्हणतो, “जर शिवाजी मिरज,अंकोला,शिवेश्वर,कारवार या ठिकाणी चालून आला,तर लोक एवढे घाबरले आहेत,ते तोंड देण्याऐवजी पळून जातील.”

शिवरायांना खरेतर पोर्तुगीजांच्या ताब्यातील प्रदेश मुक्त करायचा होता.त्यासाठी शिवरायांनी 7000 लोकांची फ़ौज या मोहीमेसाठी जमा केली होती,पण त्याच आधी शिवछत्रपतींचा दुर्दैवी मृत्यु झाला. शिवरायांच्या मृत्युनंतर पोर्तुगीजांनी आपल्या राजाला लिहीले, “हा शिवाजी युद्ध काळापेक्षा शांततेच्या काळात च अधिक घातक होता.”

शहाजी महाराजांच्या पराक्रमाची जेवढी होती,त्याहीपेक्ष जास्त दहशत शिवरायांनी निर्माण केली होती.आणि समुद्रावर मराठ्यांचे जरिपटके मोठ्या डौलाने फडकत होते. पुढे,शंभू छत्रपतींच्या कार्यकाळात पोर्तुगीजांनी शांततेचे धोरण स्वीकारले होते.पण स्वराज्या विरोधी कारवाया करण्यास त्यांना वेळ लागला नाही. अंजदिव बेट प्रकरण असो,या चौल रेवदंड्या वरीलस्वारी असो.संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धूळ चारली. पण एक विशेष गोष्ट म्हणजे,गोव्यातल्या एका संताला,पॅट्रन म्हणजे रक्षणकर्ता ही पदवी मिळाली ती संभाजी महाराजांच्या पराक्रमामुळे..!!

जुवे बेटावरील युद्धानंतर पोर्तुगीज इतके खचले की त्यांना पुन्हा तितक्या सक्षमतेने मराठ्यांशी लढा देण्याचे बळ उरलेच नाही.संभाजी महाराजांच्या काळात सिद्धी आणि मुघलांच्या आरमाराच्या सहाय्याने पोर्तुगीजांनी मराठा अरमाराला तोंड देण्याचा प्रयत्न केला,पण त्यात त्यांना पुर्ण अपयश आले. पुढे,शाहू छत्रपतींच्या काळात,म्हणजेच 18 व्या शतकाच्या सुरुवातीस भारतातील सर्वात प्रबळ आरमार म्हणून मराठा आरमाराकडे पाहील्या जात होते.मलाबारचा राजा जेम्स प्लांटेन स्वताः शाहू छत्रपतींच्या आश्रयाला होता आणि जगतले सर्वात घातक समजल्या जाणारे pirates म्हणजे समुद्री चाचे मराठ्यांच्या आरमाराकडे आश्रयाला येत.आणि यामागे कारणीभूत होते शाहू छत्रपतींचे राज्यविस्तार धोरण आणि कान्होजी आंगरेंचा पराक्रम..!!
इंग्रजांच्या रॉयल नेवीचे आणि पोर्तुगीजांच्या आरमाराचे धिंडवडे मराठा आरमाराने वेळोवेळी काढले.

शिवछत्रपतींनी मोठ्या दूरदृष्टीने स्थापलेल्या मराठा आरमाराला शाहू छत्रपतींच्या काळात खुप मोठी ऊंची प्राप्त झाली होती..समुद्रावरील सर्व शत्रुंना तोंड देऊन समुद्रावर आपले अधिराज्य जमावणार्या मराठा आरमाराचा आज स्थापना दिन. इंग्रजांशी लढण्यात आपल्या आरमाराने केलेला पराक्रम सर्रास वाचायला मिळतो,पण पोर्तुगीजांची सत्ता उखडून टाकण्यात आपल्या आरमाराने केलेले पराक्रम कुठेतरी दुर्लक्षिल्या जातात.आणि त्याच दुर्लक्षित भागावर किंचितसा प्रकाश टाकन्याचा हा प्रयत्न..!!

मराठा आरमार दिनाच्या शुभेच्छा..!!
साभार- केतन पुरी

Loading...
Previous Post

अमृतसर दुर्घटनेतील ट्रेनच्या ड्रॉयव्हरने खरोखर आत्महत्या केली का? वाचा व्हायरल पोस्टमागचे सत्य..

Next Post

हॉलीवुडने लक्षात ठेवला इतिहासातील मराठा, पायरेट्स ऑफ दी कॅरेबियन मधुन आणला उजेडात

Next Post
हॉलीवुडने लक्षात ठेवला इतिहासातील मराठा, पायरेट्स ऑफ दी कॅरेबियन मधुन आणला उजेडात

हॉलीवुडने लक्षात ठेवला इतिहासातील मराठा, पायरेट्स ऑफ दी कॅरेबियन मधुन आणला उजेडात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील वाचा

What Is Jiffy Trading App, Feature Of Jiffy Trading Apk File

July 15, 2022

Best Gold Loan Bank IN India

July 15, 2022

What Is Win Trade Apps, Features Of Win Trade App

July 15, 2022
सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

May 24, 2022

What is Health Insurance & Its Advantages?

April 28, 2022

Top Online MBA Colleges in the USA

April 28, 2022
Load More

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • About Us
  • About Us
  • Advertise
  • All Articles
  • Archive
  • Blog
  • Contact Us
  • Contacts
  • Easy Sharing
  • Home
  • Infinite Scroll
  • Our Team
  • Overlay Header
  • Portfolio
  • Privacy Policy
  • Services
  • Sorted by Topics

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In