टोलनाक्यांवर (Toll Tax Rule) वाहनचालकांकडून टोलवसुली केली जात असली तरी हा टोल भरण्यासाठी लांबलचक रांगा लागतात. त्यामुळे वाहनचालकांचा तासनतास या रांगांमध्ये खोळंबा होता. एखाद्या व्यक्तीचे नुकसान हे केवळ ने केवळ त्याच्या अज्ञानामुळे होत असते. अनेकांना गर्दी, तासनतास वाहानांच्या रांगेत उभे राहणे हे सवयीचे होऊन गेलंय. कितीही त्रास झाला तरी एक ब्र ही न काढता मुकाट्याने आपला रस्ता नापायचा हेच काय ते आपले नशीब. पण एका ठिकाणीमात्र ह्या सगळ्याचा बांध फुटतो आणि तो म्हणजे टोल नाका.
महाराष्ट्रातील कुठल्याही टोल नाक्यावरती जर आपणास ताटकळत उभा राहावे लागले तर काय करावे? असा प्रश्न अनेकदा पडतो, यावर उत्तर सापडलं आहे. टोल बूथ पासून शंभर मिटर चा एक पिवळा पट्टा आखलेला असतो जर वाहनांची रांग या पिवळ्या पट्याच्या बाहेर गेली तर, शंभर मिटर पट्याच्या बाहेरील सर्व वाहने मोफत सोडावीत. तसेच पिवळ्या पट्ट्याच्या आत 3 मिनीटा पेक्षा जास्त वेळ लागला तर ही आपण टोल भरून नये. असा राज्य शासनाचा आदेश आहे. या नियमाचे उल्लंघन टोल कर्मचारी करत असतील तर, पोलीसांशी संपर्क साधून लिखीत तक्रार टोल कंपनी विरोधात करावी.
असे कित्येक नियम, सवलती असतील ज्या अपणापर्यंत योग्य मार्गाने पोहोचत नसतील अथवा त्या पोहोचू दिल्या जात नसतील. इथे नुसते डोळे नाही तर मनदेखील उघडे ठेवावे लागेल. असो, तर पुन्हा कधी तुम्ही पिवळ्या पट्टीच्या मागे अडकलात तर विश्वासाने गाडी गियरमध्ये टाका आणि भुर्रर्रकन निघून जा. कोणताच माईकालाल तुम्हाला अडवणार नाही.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…