Tuesday, June 28, 2022
  • Login
Khaas Re
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
Khaas Re
No Result
View All Result

फटाके निर्मितीत उतरलेले शिवकाशी गाव दरवर्षी करते २०००० कोटींची कमाई

khaasre by khaasre
November 1, 2019
in बातम्या
0
फटाके निर्मितीत उतरलेले शिवकाशी गाव दरवर्षी करते २०००० कोटींची कमाई

तामिळनाडूतील मदुराई ते कन्याकुमारी मार्गावर असलेले शिवकाशी गाव दिवाळीच्या काळात अनेकदा चर्चेत असते. देशातील फटाके निर्मितीचे हे सर्वात मोठे केंद्र आहे. भारतातील ९०% फटाके एकट्या शिवकाशीत तयार केले जातात. इथे जवळपास २००० फटाके निर्माते आहेत. सर्वोच्च न्यायालयाने प्रदूषणाच्या कारणामुळे फटाक्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या सहा प्रकारच्या रसायनांवर बंदी घातल्यामुळे या व्यवसायात घट होत चालली आहे.

शिवकाशीने मागच्या वर्षी जवळपास २०००० कोटींच्या फटाके विक्रीचा व्यवसाय केला होता. जवळपास पाच लाख लोकांचा प्रपंच या व्यवसायावर चालतो. जाणून घेऊया शिवकाशी कसे बनले फटाक्यांचे गाव…

काडेपेटी निर्मितीमधून आला फटाके निर्मितीचा व्यवसाय

१९२२-२३ च्या दरम्यान शिवकाशीचे षण्मुगम नाडर आणि अय्या नाडर हे दोन व्यापारी बंधू कोलकाता येथील दास गुप्तांच्या काडेपेटी कारखान्यात कामाला होते. त्या दरम्यान त्यांनी काडेपेटी बनवण्याचे ज्ञान हस्तगत केले आणि शिवकाशीला येऊन स्वतःचा काडेपेटीचा कारखाना सुरु केला. त्यासाठी जर्मनीवरुन आधुनिक यंत्रसामुग्री मागवली.

काडेपेटी निर्मितीच्या व्यवसायाचा जम बसल्यानंतर १९२६ मध्ये दोघांनी विभक्त होऊन व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला. १९४२ मध्ये षण्मुगम नाडर यांनी स्टॅंडर्ड तर अय्या नाडर यांनी कालेश्वरी फायरवर्क्स या ब्रँड नावाने फटाके निर्मितीच्या व्यवसायाला सुरुवात केली.

दुसर्‍या महायुद्धानंतर शिवकाशी बनले भारतातील फटाके हब

दुसरे महायुद्ध १९३९-१९४५ पर्यंत चालले. या काळात नाडर बंधूंच्या स्टॅंडर्ड फायरवर्क्स आणि कालेश्वरी फायरवर्क्स व्यवसायाने जम बसवायला सुरुवात केली. शिवकाशीत असणारा कमी पाऊस आणि कोरडे वातावरण हे फटाके निर्मितीसाठी ते आदर्श वातावरण होते. त्यामुळे बघता बघता शिवकाशी भारताचे फटाका हब बनले.

१९८० पर्यंत शिवकाशीमुळे फटाके निर्मितीतील चीनची दहशत मोडून निघाली आणि भारताला फटाका निर्यातदार देश बनला. आज त्यांचे अनिल, गिलहरी, मुर्ग, मोर, घंटी, स्टॅंडर्ड अशा ब्रँडचे फटाके भारतात आणि भारताबाहेर फोडले जातात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...
Previous Post

खड्डे दाखवा पाचशे रुपये मिळवा स्पर्धा

Next Post

या २ युवा आमदारांपैकी एकाला करा मुख्यमंत्री, माजी IPS अधिकाऱ्याने सुचवली नावं!

Next Post
या २ युवा आमदारांपैकी एकाला करा मुख्यमंत्री, माजी IPS अधिकाऱ्याने सुचवली नावं!

या २ युवा आमदारांपैकी एकाला करा मुख्यमंत्री, माजी IPS अधिकाऱ्याने सुचवली नावं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील वाचा

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

May 24, 2022

What is Health Insurance & Its Advantages?

April 28, 2022

Top Online MBA Colleges in the USA

April 28, 2022

4 Most Popular Digital Marketing Agency USA and List

April 27, 2022

The Top 10 Affiliate Marketing Companies for Beginners.

April 27, 2022

The Best affiliate company to work for in the USA

April 27, 2022
Load More

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • About Us
  • About Us
  • Advertise
  • All Articles
  • Archive
  • Blog
  • Contact Us
  • Contacts
  • Easy Sharing
  • Home
  • Infinite Scroll
  • Our Team
  • Overlay Header
  • Portfolio
  • Privacy Policy
  • Services
  • Sorted by Topics

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In