राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालकांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांचे नाव या कथित घोटाळ्यात असून त्यांच्यावर देखील ईडीने गुन्हा दाखल केला आहे.
काल शरद पवार हे स्वतः ईडीच्या कार्यालयात हजर होणार होते. सकाळपासूनच मुंबईत नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज नेते यावेळी हजर होते. पण यामध्ये अजित पवार हे उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. कालच्या या ईडी नाट्यानंतर अचानक अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली होती.
अजित पवार यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडूनही मंजूर करण्यात आला. काल सायंकाळी कार्यालयात येऊन राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी राजीनामा मंजूर करण्यासाठी फोन करून सांगितले आणि राजीनामा मंजूर करण्यासाठी सांगितले.
विधानसभाध्यक्षांच्या विधिमंडळ कार्यालयात ज्यावेळी अजित पवार काल गेले त्यावेळी हरिभाऊ बागडे तेथे नव्हते. त्यानंतर त्यांच्या पीएच्या हाती राजीनामा सोपवला. तसेच बागडेंना फोन करून याची माहीती दिली. यानंतर बागडेंनी सायंकाळी ५.४० मिनिटांनी हा राजीनामा मंजूर केला. यानंतर त्यांचा मोबाईल बंद होता.
राष्ट्रवादीच्या कोणत्याही बड्या नेत्यांना हा राजीनामा का दिला याविषयी माहिती नव्हती. स्वतः त्यांचे चिरंजीव पार्थ पवार याना देखील याचे कारण माहिती नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर अजित दादा हे तब्बल १९ तास नॉट रिचेबल होते.
या सर्व घडामोडीनंतर आज ते शरद पवार यांच्या भेटीला त्यांच्या मुंबईच्या घरी आले. त्यानंतर पवार कुटुंबीयांमध्ये दीड तास चर्चा झाली. हि बैठक झाल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व गोष्टींचा उलगडा केला आहे.
अजित पवार यांनी राजीनामा कोणाला कल्पना न देता का दिला याचे कारण देताना सांगितले कि त्यांना राजीनामा पक्षातील नेत्यांनी दिऊ दिला नसता. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची माफी देखील मागीतली.
अजित पवार पुढे म्हणाले जो कथित घोटाळा आहे त्यामध्ये सर्वपक्षीय नेते असताना आपल्यावर चुकिचे घाणेरडे आरोप होत असल्याचा आरोप केला आहे. ठेवीच्या रकमेपेक्षा मोठा घोटाळा कसा? असा सवालही त्यांनी केला आहे.
शरद पवार यांची बदनामी होत असून विरोधक चुकीचे आरोप करत आहेत. साहेबाना आपल्यामुळे या वयात बदनामी सहन करावी लागत असल्याने त्यांनी अस्वस्थ होऊन राजीनामा दिला असल्याचे सांगितले. राजीनामा दिल्यानंतर ते काल मुंबईतच होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.