अजित पवार यांनी राजीनामा देत असल्याची माहिती शरद पवार यांनाही दिली नसल्याची माहिती स्वतः शरद पवार यांनी सांगितली आहे. त्यांच्यावर राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यासोबतच शरद पवार यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे अजित पवार हे प्रचंड अस्वस्थ होते. त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना राजकारण खूप घाणेरडे झाल्याचे सांगत त्यातून बाहेर पडून शेती उद्योग करण्याचा विचार सांगितला होता.
राजकारणातील पातळी घसरली असल्याची चर्चा त्यांनी आपले चिरंजीव पार्थ यांच्याशी केली होती. तसेच पार्थला देखील राजकारणात न जाता उद्योग शेतीकडे वळण्याचा सल्ला दिला आहे. शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे प्रचंड अस्वस्थ होऊनच त्यांनी राजीनामा दिला असावा असे पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितल.
काय घडलं दिवसभरात-
आज शरद पवार हे स्वतः ईडीच्या कार्यालयात हजर होणार होते. सकाळपासूनच मुंबईत नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज नेते यावेळी हजर होते. पण यामध्ये अजित पवार हे उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. आजच्या या ईडी नाट्यानंतर अचानक अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली.
अजित पवार यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडूनही मंजूर करण्यात आला आहे. आज सायंकाळी कार्यालयात येऊन राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी राजीनामा मंजूर करण्यासाठी फोन करून सांगितले आणि राजीनामा मंजूर करण्यासाठी सांगितले.
विधानसभाध्यक्षांच्या विधिमंडळ कार्यालयात ज्यावेळी अजित पवार आज गेले त्यावेळी हरिभाऊ बागडे तेथे नव्हते. त्यानंतर त्यांच्या पीएच्या हाती राजीनामा सोपवला. तसेच बागडेंना फोन करून याची माहीती दिली. यानंतर बागडेंनी सायंकाळी ५.४० मिनिटांनी हा राजीनामा मंजूर केला. यानंतर त्यांचा मोबाईल बंद आहे.
राष्ट्रवादीच्या कोणत्याही बड्या नेत्यांना हा राजीनामा का दिला याविषयी माहिती नव्हती. स्वतः त्यांचे चिरंजीव पार्थ पवार याना देखील याचे कारण माहिती नसल्याचे सांगितले होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.