Wednesday, June 22, 2022
  • Login
Khaas Re
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
Khaas Re
No Result
View All Result

गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन का केले जाते हे माहित आहे का ?

khaasre by khaasre
September 9, 2019
in नवीन खासरे
0
गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन का केले जाते हे माहित आहे का ?

“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” म्हणत यंदा १२ सप्टेंबर रोजी आपल्या लाडक्या गणपतीचे विसर्जन केले जाणार आहे. दहा दिवस आपल्या घरात किंवा गावातील मंडळात गणपती बसवून तुम्ही त्याची पूजा केली असेल.

दोन वेळ आरती केली असेल. सांस्कृतिक कार्यक्रम घेतले असतील. विविध उपक्रम राबवले असतील. दहा दिवस बघता बघता समोर आले. आता आपल्या लाडक्या गणरायाला भक्तिभावे निरोप देण्यासाठी आपली तयारीही सुरु झाली असेल. पण आपण आपल्या लाडक्या गणपतीचे विसर्जन का करतो ? माहित आहे का ? चला तर जाणून घेऊया…

पुण्यातील क्रांतिकारक भाऊसाहेब रंगारी यांनी सर्वप्रथम भारतात सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला होता. दहा दिवस गणेशोत्सव आयोजित करून त्या माध्यमातून भारतीयांना एकत्र आणायचे आणि ब्रिटिश सत्तेविरोधात त्यांना जागे करायचे असा रंगारींचा विचार होता.

त्यांची ही कल्पना बाळ गंगाधर टिळकांनाहा आवडली आणि त्यांनीही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली. याचा परिणामही अगदी हवा तसाच झाला. लोक धार्मिक भावनेने ब्रिटिश सत्तेविरुद्ध एकत्र आले. स्वातंत्र्य लढ्यासाठी ही मोठी प्रेरणा ठरली.

का केले जाते गणेश विसर्जन ?

धार्मिक ग्रंथांनुसार वेद व्यासांनी गणेश चतुर्थीपासून सलग १० दिवस श्रीगणेशाला महाभारत कथा सांगितली होती. ती कथा श्रीगणेशाने अक्षरशः लिहून काढली. १० दिवसानंतर जेव्हा वेद व्यासांनी आपले डोळे उघडले, तेव्हा त्यांना आढळले की दहा दिवसांच्या अथक परिश्रमामुळे गणेशाचे तापमान खूप वाढले होते. ताबडतोब वेद ​​व्यास गणेशाला जवळच्या तलावात घेऊन गेले आणि त्याला थंड केले. म्हणूनच गणेशाची स्थापना करून चतुर्दशीला गणपतीला पाण्याने थंड केले जाते.

पुढे याच कथेत असेही सांगितले आहे की, गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून वेद व्यासांनी गणपतीच्या शरीराला सुगंधित मातीचा लेप दिला होता. हा लेप सुकल्यानंतर गणपतीचे शरीर ताठ झाले. मातीही गळायला लागली. मग गणपतीला थंड तलावावर नेऊन पाण्यात उतरवण्यात आले.

या दहा दिवसांदरम्यान वेद व्यासांनी गणपतीला आवडते भोजन दिले. तेव्हापासून प्रतिकात्मकरीत्या गणेशाची मूर्ती स्थापन करून दहा दिवस गणपतीला मोदकांचा प्रसाद चढवून दहा दिवसानंतर पाण्यात नेऊन विसर्जन करण्याची प्रथा पडली.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...
Previous Post

तू कोणत्या वयात व्हर्जिनिटी गमावलीस? चाहत्याच्या प्रश्नाला इलियानाचे सडेतोड उत्तर

Next Post

माणसाला डास उगाच चावत नाहीत, डास चावण्यामागे असतात ही प्रमुख कारणे

Next Post
माणसाला डास उगाच चावत नाहीत, डास चावण्यामागे असतात ही प्रमुख कारणे

माणसाला डास उगाच चावत नाहीत, डास चावण्यामागे असतात ही प्रमुख कारणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील वाचा

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

May 24, 2022

What is Health Insurance & Its Advantages?

April 28, 2022

Top Online MBA Colleges in the USA

April 28, 2022

4 Most Popular Digital Marketing Agency USA and List

April 27, 2022

The Top 10 Affiliate Marketing Companies for Beginners.

April 27, 2022

The Best affiliate company to work for in the USA

April 27, 2022
Load More

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • About Us
  • About Us
  • Advertise
  • All Articles
  • Archive
  • Blog
  • Contact Us
  • Contacts
  • Easy Sharing
  • Home
  • Infinite Scroll
  • Our Team
  • Overlay Header
  • Portfolio
  • Privacy Policy
  • Services
  • Sorted by Topics

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In