न्यूझीलंडने भारताचा १८ धावांनी पराभव करत विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताला या विश्वचषकाचे प्रमुख दावेदार मानले जात होते. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत न्यूझीलंडला २३९ धावांवर रोखले होते. भारतीय फलंदाजांनी या विश्वाचषकात दमदार कामगिरी केली होती. पण आजच्याच सामन्यात टॉप ऑर्डरच्या ४ फलंदाजांना अपयश आल्याने टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.
विश्वचषक स्पर्धेतील भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात उपांत्य फेरीतील सामना अत्यंत रोमहर्षक ठरला. न्यूझीलंडच्या २४० धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाचा डाव सुरुवातीलाच ढेपाळला. रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली बाद झाल्यानंतर लोकेश राहुलनेही लागलीच विकेट दिली.
त्यामुळे ३ बाद ५ अशी दयनीय अवस्था टीम इंडियाची झाली होती. त्यानंतरही दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत लगेचच बाद झाले. त्यामुळे भारत पराभवाच्या छायेत होता. सुरुवातीला पंड्या आणि धोनीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण पंड्या लवकर बाद झाला आणि भारतातही अवस्था ६ बाद ९२ अशी झाली.
धोनी आणि जडेजाने मोठी पार्टनरशिप करून टीम इंडियाला विजयाच्या जवळ नेऊन पोहचवले पण ते दोघे विजय मिळवून देण्यास अपयशी ठरले आणि भारताचे विश्वचषकाचे स्वप्न भंगले. जडेजाने ५९ बॉलमध्ये ७७ धावांची जबरदस्त खेळी खेळली पण तो फटका मारण्याच्या नादात आउट झाला.
टीम इंडियाच्या दोन सदस्यांचा राजीनामा-
टीम इंडियाच्या या मॅचपूर्वीच या दोन सदस्यांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाचे फिटनेस आणि कंडिशनिंग प्रशिक्षक शंकर बासू आणि फिजिओ पॅट्रीक फर्हाट हे वर्ल्ड कपनंतर आपल्या पदांचा राजीनामा देणार आहेत.
पॅट्रीक फहार्ट आणि शंकर बासू यांना बीसीसीआयने नवीन कराराची ऑफर दिली होती, पण या दोघांनी विश्रांती हवी असल्याचं सांगत नवा करार करायला नकार दिला.
शंकर बासू आणि पॅट्रीक फहार्ट यांच्यामुळे टीम इंडियाचा फिटनेस बऱ्याच प्रमाणात सुधारला. विराट कोहलीनेही आपला फिटनेस सुधारण्यात शंकर बासूंची महत्त्वाची भूमिका असल्याचं सांगितलं होतं.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.