Tuesday, June 28, 2022
  • Login
Khaas Re
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
Khaas Re
No Result
View All Result

राहुल गांधींनी सांगितले संसदेत मोदींची गळाभेट घेण्यामागचे कारण !

khaasre by khaasre
May 8, 2019
in राजकारण
0
राहुल गांधींनी सांगितले संसदेत मोदींची गळाभेट घेण्यामागचे कारण !

काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी इंडिया टुडेला एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्यांनी देशविदेशातील अनेक मुद्यांवर चर्चा केली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपासून ते महागठबंधन पर्यंत, प्रधानमंत्री मोदींपासून ते ममता बॅनर्जीपर्यंत आणि आतंकवादापासून ते काश्मीर प्रश्नापर्यंत विचारण्यात आलेल्या अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तर दिली. याच मुलाखतीत आपण संसदेत नरेंद्र मोदींची गळाभेट का घेतली याचेही उत्तर त्यांनी दिले. जाणून घेऊया काय म्हणतात राहुल गांधी…

काय होते प्रकरण ?

२०१८ च्या जुलै महिन्यात मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर विरोधकांकडून अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भाषणापूर्वीच भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवली होती. पण त्यानंतर राहुल गांधींनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदी सरकारचे असे का वाभाडे काढले की देशात त्याची चर्चा झाली.

भाषणाच्या शेवटी त्यांनी सांगितले की, “भाजप, मोदी आणि संघाच्या मनात माझ्याबद्दल राग आहे. त्यांच्या दृष्टीने मी पप्पू आहे. ते लोक माझ्याविषयी अपप्रचार करतात. पण माझ्या मनात त्यांच्याविषयी अजिबात राग नाही.” एवढे बोलून राहुल गांधी थेट मोदींच्या जवळ गेले आणि त्यांनी मोदींची गळाभेट घेतली. या प्रकाराने काही वेळ मोदी, सत्ताधारी आणि विरोधकही चकित झाले होते.

का घेतली राहुल गांधींनी मोदींची गळाभेट ?

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत याविषयी राहुल गांधींनी सांगितले की, “नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र नीतीचा अर्थ जास्तीत जास्त नेत्यांची गळाभेट घेणे असा आहे. मी नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली होती, त्यात प्रेम होते. मी एक प्रधानमंत्री पाहिले ज्यांना गोष्टी हाताळता येत नाहीत. मी एक असे प्रधानमंत्री पाहिले ज्यांना देश चालवणे म्हणजे कुठले राज्य चालवण्यासारखे नसते हा अनुभव आला होता आणि ते त्यात फसले होते.

ते एकापाठोपाठ एक चुका करत सुटले होते. माझ्यावर रागवत होते. माझ्यावर ओरडत होते. मला त्यांची दया आली, त्यांच्याविषयी प्रेम जाणवले. मी सांगितले, मी तुमची गळाभेट घेणार आहे. म्हणून मी त्यांची गळाभेट घेतली. गळाभेट घेण्यामध्ये माझा त्यांच्यासाठी एक संदेश होता, ऐका मी तुमचा विरोधक आहे परंतु देशहितासाठी मी आपली मदत करायला तयार आहे. मी पुढे सरसावली पण त्यांनी मला दूर ढकलले.”

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...
Previous Post

समुद्रकिनारी जायचंय ? दमणला जा ! राहणं आणि खाणं आहे एकदम स्वस्त !

Next Post

कडकनाथ नेमका कोणाचा ? दोन राज्यामध्ये लागले भांडण !

Next Post
कडकनाथ नेमका कोणाचा ? दोन राज्यामध्ये लागले भांडण !

कडकनाथ नेमका कोणाचा ? दोन राज्यामध्ये लागले भांडण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील वाचा

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

May 24, 2022

What is Health Insurance & Its Advantages?

April 28, 2022

Top Online MBA Colleges in the USA

April 28, 2022

4 Most Popular Digital Marketing Agency USA and List

April 27, 2022

The Top 10 Affiliate Marketing Companies for Beginners.

April 27, 2022

The Best affiliate company to work for in the USA

April 27, 2022
Load More

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • About Us
  • About Us
  • Advertise
  • All Articles
  • Archive
  • Blog
  • Contact Us
  • Contacts
  • Easy Sharing
  • Home
  • Infinite Scroll
  • Our Team
  • Overlay Header
  • Portfolio
  • Privacy Policy
  • Services
  • Sorted by Topics

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In